स्पेशल ड्राईव्ह : दुरावलेले संसार जुळाले..! : ऱाष्ट्रीय लोक अदालत: लोक अदालतची यशस्वी गाथा
By Kanya News ।।
सोलापूर : लोक न्यायालयाच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच दिवस स्पेशल ड्राईव्ह प्रत्येक प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात घेण्यात आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये सदर पाच दिवसांमध्ये ३४४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, वकील संघटना, पॅनल विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, विविध वित्तीय संस्थाचे अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे अधीक्षक शमशोद्दीन नदाफ, सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
लोक अदालतची यशस्वी गाथा :
- १) पिठासन अधिकारी, शाळा न्यायाधिकरण, सोलापूर जे.एम.काकडे यांच्या लोक अदालत पॅनल क्रमांक : २ मध्ये सोलापूर येथील कौंटुंबिक न्यायालयातील खटले या पॅनलच्या समोर ठेवण्यात आले होते. अर्जदार व सामनेवाली यांच्यामध्ये मार्च २०२३ आळंदी, पुणे येथे प्रेम विवाह झाला होता. तद्नंतर पती पत्नीमध्ये कौंटुंबिक वाद झाला. यामध्ये अर्जदार पती यांनी पत्नीच्या विरोधात कोटुंबिक न्यायालयामध्ये धाव घेतली होती. पती-पत्नीमधील हा वाद या लोकन्यायालयात यशस्वीपणे मिटविण्यात यश आले. पत्नी ही पती सोबत आनंदाने नांदावयास जाण्यास तयार झाली.
२) अर्जदार व सामनेवाला यांचा विवाह सन मे-२०१९० मध्ये सोलापूर येथे झाला. काही वर्षानी पती-पत्नी यांच्यामध्ये कौटुंबिक कलह निर्माण झाले. हा वाद देखील कौंटुंबिक न्यायालयात गेला. यामध्ये ही पत्नी आनंदाने नांदावयास गेली. लोकअदालतमध्ये हा वाद यशस्वीपणे मिटविण्यात पॅनल प्रमुख पिठासन अधिकारी, शाळा न्यायाधिकरण जे.एम.काकडे यांना यश आले.
- ३) अर्जदार यांनी सामनेवालीविरुध्द कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट कलम ९ प्रमाणे नांदावयास येण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सामनेवाली ही नांदावयास गेली. यामध्ये ही पॅनल प्रमुख जे.एम.काकडे पिठासन अधिकारी, शाळा न्यायाधिकरण यांना यश आले. सोलापूर पॅनल सदस्य अँड.एस.एस.झुरळे, अर्जदार व सामनेवाला यांचे वकील यांनी विशेष प्रयत्न केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश मो. सलमान आझमी यांनी लोक न्यायालयात प्रकरण तडजोडीने मिटविल्यामुळे अर्जदार व सामनेवालीचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव उमेश देवर्षी यांनीही अर्जदार व सामनेवाली यांना लोक अदालतमध्ये प्रकरण मिटविल्या मुळे शुभेच्छा दिल्या.
४) सोलापूर येथील कामगार न्यायालयातील खटला लोकन्यायालयात मिटविण्यात यश आले. पॅनल प्रमख जे.एम.काकडे यांनी अर्जदार व सामनेवाला (विमाकंपनी) यांच्यातील वाद हा डब्ल्यू. सी./पी.सी. अॅक्टचे कलम ४, ७ व २३ प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा होता. नुकसान भरपाईची रक्कम १२,२३,०२५/- रुपायांची मागणी होती. तडजोडी अंती ही ९०,७०,००० रुपये इतक्या रकमेवरती यशस्वी तडजोड करण्यात आली.
- ५) दि. २५/९/२०२१ रोजी मोटार सायकलवरून येत असतांना ट्रॅक्टर व मोटारसायकल्ची धडक झाल्याने अपघातामध्ये मयत झाले. मयताचे वारस पत्नी, दोन मुले, आई-वडील यांनी मोटार अपघात नुकसान भरपाई मिळण्यासाठी अँड. बी.बी. देशमुख यांच्यावतीने जिल्हा न्यायालय, सोलापूर येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्यामध्ये ट्रॅक्टरची विमा कंपनी व मयतांचे वारस यांच्यामध्ये आपसात तडजोड होऊन रक्कम ९०,००,०००/– रुपयांमध्ये सदरचे प्रकरण या लोक अदालतीमध्ये तडजोडी वरुन निकाली काढण्यात आले. पॅनल प्रमुख वाय..ए.राणे, जिल्हा न्यायाधीश–३, सोलापूर व पॅनल सदस्य अंड. एस.एस..राऊत यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले.
६) मयत शिक्षक हे कर्नाटकातील बल्लाळी या गावाचे रहिवासी होते. आपल्या स्वता:च्या कारमधून ते गावी जात असताना रस्त्यात कारचा अपघात होउन मयत झाले. मोटार अपघात प्राधिकरण येथे मयताचे वारस आई-वडील यांनी एच.डी.एफ.सी इंन्शुरन्स कंपनी यांच्याविरुध्द क्लेम केला. लोक न्यायालयात तडजोडअंती रक्कम रुपये ८३,००,०००/– मयत वारस यांना विमा कंपनीकडून देण्यात आले. पॅनल प्रमुख वाय ए.राणे, जिल्हा न्यायाधीश–३ ,सोलापूर व पॅनल सदस्य अँड. एस.एस.राऊत यांनी विशेष प्रयत्न केले.
- ७) कौटुंबिक न्यायालय सोलापूर येथे अर्जदाराने याने माहे एप्रिल-२०१७ मध्ये हिंदू विवाह कायदा कलम १३ (९) प्रमाणे विवाह विच्छेदनाकरीता अर्ज दाखल केला होता. पती-पत्नी यांच्यातील वाद हा अंतिम टप्पात आला होता. अशा नाजूक अवस्थेत हे प्रकरण जिल्हा न्यायालयात लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले. या दाम्पत्याला एक लहान मुलगा आहे. अर्जदार हा पुणे येथील एका शाळेत शिपाई या पदावर होता. त्याची पत्नी ही गृहीणी आहे. पती–पत्नी यांच्यामध्ये चर्चा करुन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला यश मिळाले. सदरचे प्रकरणामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.एस.आझमी यांनी स्वत :हून लक्ष घातले. तडजोडी अंती पती-पत्नी एकत्र राहण्याचे ठरवले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी पती-पत्नी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना सुखी संसार करण्यास सांगितले. पक्षकाराचे वरिष्ठ वकील उंबरजे यांनी विशेष प्रयत्न केले.